Saturday, November 24, 2012

पाणी जीवन जीवन म्हणजे पाणी

पाणी जीवन जीवन म्हणजे पाणी किती छान वाटते हे वाचून. पण या पाण्या साठी आपण काय करत आहोत?
सध्या मराठवाड्यात पाण्याची खूप टंचाई आहे. पावसाला संपून अवघा १ महिना  हि  झाला नाही आणि पाणी टंचाई सुरु झाली. मराठवाड्याची राजधानी असणार्या औरंगाबाद मध्ये हि पाण्यासाठी वणवण सुरु झाली.पण अजूनही असलेल्या पाण्याचे नियोजन आपण करत नाही याचे ज्वलंत उदाहरण शहरातल्या वस्त्यांमध्ये दिसते. पाणी आले कि पाणी भरणे कमी आणि सांडणे जास्त, हे जर बघायचे असेल तर पाणी आले कि गल्लीतल्या कोपर्यावर उभे राहून पाण्याचे पात वाहताना दिसतात आपणच जर पाण्याचा असा अपव्य केला तर काय होईल याची कल्पना करून बघा. आता डिसेंबर आहे अजून उन्हाळा यायचा आहे काय हाल होणार आहे देवालाच माहित 

बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बाळासाहेब गेले आणि त्यांच्या स्मारकाचा वाद सुरु झाला. महाराष्ट्रा चा नव्हे तर संपूर्ण भारताचा असा हा एक थोर नेता एक पितृतुल्य व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी मन हेलावले,पण आता एक नाही दोन नाही अनेक प्रश्न मराठी जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. बाळासाहेबांचे स्मारक झालेच पाहिजे यात काही दुमत असण्याचे कारण नाही.कुठे झाले पाहिजे हा वादाचा विषय ठरू नये  असे सर्व मराठी मनाला आवर्जून वाटत आहे. पण त्याची कोणी काळजी करताना दिसत नाही.
बाळासाहेबांचे स्मारक करा, मराठी साहित्याचे मोठे वाचनालय उभारले पाहिजे,त्यांचे एक वस्तुसंग्रहालय झाले पाहिजे, रस्त्यांना त्यांचे नाव दिले पाहिजे, हॉस्पिटल्स ला त्यांचे नाव दिले पाहिजे, आणि हे झालेच पाहिजे यात काही कसूर करून चालणार नाही.
पण त्यांच्या विचारांचे काय आपण आज त्यांच्या विचारांची कदर करत आहोत का ? करतही असलो तरी त्या विचारानं प्रमाणे आपण वागत आहोत का याचे   आपण चिंतन केले पाहिजे.
बळासाहेबांसारखा थोर नेता आपल्या तून निघून गेला ती पोकळी  जर भरून काढायची म्हंटले तरी ती भरणार नाही तरी देखील त्यांचा स्वप्नातला महाराष्ट्र आपणच घडवू शकतो हे विसरून चालणार नाही.
बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
जय  महाराष्ट्र